शुक्रवार, २५ मार्च, २०२२

काश्मीरः भारताचा यूक्रैन!

 लोकमत

माझी टिप्पणी: भारतातील विचारांवर प्रभाव टाकण्यासाठी जैन धर्मासाठी यापेक्षा चांगली वेळ कधीही आली नसेल. येथे जैन धर्माचे भावनिकतांच्या सिद्धांताचा वापर केला गेला  आहे.. हिंदू धर्म भावनिकता टाळतो. सैद्धांतिकदृष्ट्या ते तर नक्कीच आहे. हिंदू धर्म कोणत्याही गोष्टीबरोबर राहू शकतो. जगभरातील मांसाहारापासून दूर राहणाऱ्या जैन धर्मापासून पलीकडच होत आणि त्याचप्रमाणे त्सुनामी, कोरोना विषाणू, दुखावलेल्या भावना, जगभरातील भावनिक परिणामापासून टठस्ठ राहण्यात त्याची विशेष ओळख ठरते आहे. . जगभर जे काही असू शकते त्यासाठी समता आणि उपाय सुरक्षित करण्यात त्याचा मुख्य उद्देशय होत.

 पण इथे काश्मीर फाइल्सचा हेतू मुख्यत्वे भावना जागृत करण्याचा आहे. असे का घडले असावे याचा सिद्धांत कोणीही मांडू इच्छित नाही. आणि आज सुद्धा ते घडत नाही की घडणार नाही अशी परिस्थिती कुठे झाली आहे?  काश्मीर फाईल्स अजून ऑपनच आहे.  म्हणजे काश्मीर फाईल्स ची फिल्म सुद्धा काश्मीर फाईलसचा एक घटकच बनले आहे आणि त्यानी उभयपक्षाला काश्मिरचा प्रश्न जगापुढ़े आण्यात मददच होणार अशी अपेक्षा. 

 पण भारताचा मनात समोरच्या पक्षांबद्दल आणखिन घृणा उत्पन्न करणे हा हेतु चोख आहे. भारताला काश्मीरबाबतची सक्त भूमिका सार्थ ठरवण्यासाठी त्या भावनांची गरज पुरवली जात आहे असे समजत.  त्या व्यतिरिक्त ह्यानी काही साध्य करून घेण्याच आहे अस काही दिसत नाही.  भारताला संघर्ष सुरू ठेवण्यात काही उपद्व्याप दिसत नाही.  सिनेमे बनू होऊ दे,  पाहण्याचे गर्दी बनू होऊ दे.

 दुसरीकडे एक सत्य समोर आपटत की भारताला काश्मीर सोडणे शक्यच नाही. आता इथे शेवटी काही तर्क उत्पन्न होत आहे. शेवटी एर रूक्ष भावनाविरहित तर्क. काश्मिरी लोकांची काही किम्मतच मोजली जात नाही इथे. काश्मिरी लोक एक बलाढ्य भारताविरुद्ध निरर्थक लढा देत आहेत असे समजणे त्यांना रास्त होईल. भारताचा लक्ष काश्मिरियांचा वरून सीमा पलीकडे पाकिसतान आणि चीनावर आहे.  जसा की रशिया  युक्रेनियचा वर नाटॉ कडे पाहते तसा.  इथे ही भानगड समजणे किती सरळ होत जाते?

  त्यामुळे काश्मीर हे भारताचे युक्रेन आहे असे ठरवणं चुकीचा ठरणार नाही.  इथे एक मोठी गोष्ट प्रकाशात येते की इंग्रजांकडून मिळालेला  या भारतीय साम्राज्याचा वारसा किती शिताफीने सतत चालू ठेवण्यांत  यश मिळविलेला आहे. याचा सुरुवातीचे श्रेय नेहरूंना मिळते, नंतर अनेक पंतप्रधान मंत्री होऊन गेले त्यांना, आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर कदाचित त्यांच्यांमधले सर्वोत्तम स्थान घेतायेत!

आधुनिक काळातील लोकशाहीचा जो प्रत्यय येतो त्याला काश्मीर फाईल्सच्या रूपाने प्रतिसाद मिळतो. भावनिकरित्या भरलेले वातावरण आणि परिणामी व्होटबँक, अंतर्निहित साम्राज्यवादी प्रेरणांना कोणांच लक्ष न ओढता चालण्यास मुभा देते.

बहुआयामी देशात जनतेला मूर्ख बनवणे हा तेथील लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सुदैवाने परिस्थिती अशी आहे की त्यांना भारतातील देवांशी संवाद साधण्यासाठी संस्कृत भाषा आणि साम्राज्याशी सामना करण्यासाठी इंग्रजीची गरज आहे! या दोघांच्या अपुऱ्या ज्ञानामुळे त्यांना सहज दुय्यम दर्जाचा आणि उपेक्षेचा बळी बनवता येतो. हे भारतीय साम्राज्याच्या मुख्य यशांपैकी एक आहे, जे इतर कोठेही नसेल.

10-40 सांय, 25-03-2022

------------------------------------------

पूर्ण ब्लॉग वाचाः  -  मराठी अमूल्य जग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा