मूळ लेखात जाण्याकरीता हा लिंक - लोकमत_20240916
ऑक्सफर्डचा पोपट कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो?
थंड ब्रिटनमध्ये काश्मीरच्या नावाने मध्येच आग पेटवण्याचे कारण काय भारताविरुद्ध षड्यंत्र रचण्याची अनुमती कुणालाही असता कामा नये!
"मेरे प्यारे दुश्मनों...
हम तो अब आँख मे आँख डालकर देखेंगे."
माझी टिप्पणी: “आंख में आंख डाल कर देखेंगे” म्हणजे इंग्रजी म्हणी प्रमाणे बैलाला शिंगांनी पकडणे असं आव्हानात्मक दृष्टिकोन होतो. पण संपूर्ण लेख त्याच्या अगदी विरुद्धात जाऊन उभा आहे असं दिसतात. चर्चा-वादविवादापासून दूर होणे, पाकिस्तानच्या कोण्या वक्त्याला चर्चामध्ये आमंत्रण होणे हे सुद्धा एक षड्यंत्र म्हणून समझणे. याचा अर्थ हा होतो की तुम्हाला जगाची भीती वाटते, तुम्हाला आजिबात बैलाला शिंगांनी पकडायचा नाही. वादविवाद दहशतवादावर व्हायला हवेत असं म्हणणं, तर वादविवादांच्या अभावातच दहशतवादाची उत्पत्ती आहे या साध्या तर्कातला समजण्यात तुम्ही अपयशी ठरत आहात. अस चोख दिसतं की तुम्ही अशा वादविवादांपासून दूर राहत आहात कारण की त्यात तुम्हाला हरवण्याची भीती वाटते. तुमच्या विचार ठाम आहे की भारताच्या एकता आणि अखंडतेबद्दल कोणताही वाद आजीबात नको, मग काहीही असु द्या, त्यानी दहशतवाद असो किवां नसो. 40 हजारहून अधिक बळी होत असो किंवा नसो. काश्मीर लगत भारत हवेत म्हणजे हवेत.
पण तुम्हाला भारत कोणी दिला? ब्रिटीश म्हणाले ज्यांना इंग्रजी येत आहे त्यांनी कृपया हात वर करा आणि हे घ्या हा तुमचा भारत. गांधींचे, नेहरूंचे, आंबेडकरांचे हात वर आले... आणि आनंदाचा जल्लोष झाला ! अशाच रित्यानी नाहीं का सांगता येणार की काश्मिरी भाषा बोलणारे लोक हात वर करा आणि हे ध्या हा तुमचा काश्मीर?
आता लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र हा जन्मसिद्ध हक्क आहे असे प्रतिपादन केले होते. याचा अर्थ बिंदू बिंदूवर वेगळा लावावा का?
निश्चितच, स्वातंत्र्याचा अर्थ केवळ राज्य करणाऱ्यांच्या त्वचेचा रंग बदलणं असं होत नाही. याचा अर्थ त्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि आपण फक्त लोकांना मूर्ख बनवत आहोत, खरं तर देवाला मूर्ख बनवत आहोत.
11:19 a.m. 21-09-2024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा